राहुल गांधींनी राज ठाकरेंना काम मिळवून दिले आहे – अरूण जेटली

0
631

नवी दिल्ली, दि.२७ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ले करण्याचे काम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे, अशी टीका भाजप नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी फेसबुकवर पोस्ट करून केली आहे.    

जेटली पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर भारतात काय प्रतिक्रिया उमटेल, याचा जराही विचार न करता राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ले चढविण्यासाठी राज ठाकरे यांना काम दिले आहे, असे जेटली म्हणाले. राहुल गांधी हे नैराश्याने ग्रस्त आहेत. त्यामुळेच राफेल आणि उद्योगपतींना कर्जमाफी दिल्याचे बनावट कथा रचत आहेत.

राहुल गांधी यांनी आदमी पक्षाला दिल्लीतील चार जागा देण्याची तयारी दाखवली. अरविंद केजरीवाल हे काँग्रेसशी खेळत आहेत, हे माहीत असूनही राहुल गांधी यांनी केवळ पराभूत होण्याच्या निराशेतून हा प्रस्ताव दिला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.