राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा ही शिकवण संपूर्ण जगाच्या शांततेसाठी सदैव प्रेरणादायी

0
314

संगमनेर, दि.३० (पीसीबी) – यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त एकता संमेलन व हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा ही शिकवण संपूर्ण जगाच्या शांततेसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वासराव मुर्तडक, इंद्रजितभाऊ थोरात, गुलाबराव ढोले, प्रा. बाबा खरात, अड. त्र्यंबक गडाख, सुरेश थोरात, ज्ञानेश्वर राक्षे, नवनाथ अरगडे, आर. एम. कातोरे, तनवीर पठाण, के. के. थोरात, प्रा. ज्ञानेश्&वर गायकवाड, अनिल सातपुते, नितीन अभंग, सुभाष सांगळे, रोहिदास सानप आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.