बीड, दि.२७ (पीसीबी) – भाजप – शिवसेना युती होण्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. लोकसभा निवडणुकी अगोदरही माध्यमांनी चर्चा केली. पण, आम्ही एकाच दिवसात चर्चा करुन युती केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती कधी होईल हे कळणारही नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपची महाजनादेश यात्रा आज (मंगळवार) बीडमध्ये आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेबाबत माध्यमांना माहिती दिली.
यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपमध्ये मेगाभरती आणि विरोधकांची मेगागळती सुरु आहे. प्रवेशाबाबत आमची ‘फिल्ट्रेशन पॉलीसी’ आहे. जे लोक जास्त दिवस आमच्यासोबत राहू शकतात, जिथे आमच्या वाट्याची जागा आहे, अशाच ठिकाणी आम्ही प्रवेश देत आहोत. महाजनादेश यात्रा आणि विकास कामांवर भाष्य करून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य, संवाद आणि काँग्रेसच्या पर्दाफाश यात्रेवर टीकास्त्र सोडले.