मोदी सरकारचा निर्णय; प्रत्येक नागरिकाच्या खात्यात जमा होणार दरमहा २५०० हजार रूपये ?  

0
639

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळे भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकानुयी निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.   भाजपला पाच  राज्यांच्या निवडणुकांमध्ये जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे मोदी सरकारने जनतेला खूश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर दरमहा अडीच हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. यूनिव्हर्सल बेसिक इन्कम ( यूबीआय) या योजनेतर्गंत ही रक्कम नागरिकांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे.