नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – मोदी २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत, तर मी अयोध्येत जाऊन आत्महत्या करेन, असे खळबळजनक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले आहे. कट्टरवाद्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रिझवी म्हणाले की, राष्ट्र हे कोणत्याही धर्मापेक्षा मोठे असते. मी जेव्हा राष्ट्रहिताची गोष्ट करतो, तेव्हा मला कट्टरवादी लोक जीवे मारण्याची धमकी देतात. मोदी सरकार सत्तेतून जाऊ द्या, तुमचे तुकडे-तुकडे करु, अशा आपल्याला धमक्या येत आहेत.
मोदी देशाचे उत्कृष्ट पंतप्रधान आहेत. जर २०१९ मध्ये जर मोदी पंतप्रधान झाले नाहीत आणि इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता देशद्रोह्यांच्या पाठींब्याने पंतप्रधान बनला. तर मी अयोध्येत राम मंदिराच्या गेटवर जाऊन आत्महत्या करने, कारण देशद्रोह्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वाभिमानाने मरणे पसंद करेन, असे रिझवी यांनी म्हटले आहे.