मोदींची अवस्था गजनीतील आमीर खानसारखी – धनंजय मुंडे

0
462

पालघर, दि.  १३ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी इतकी आश्वासने दिली की मोदींची अवस्था आज गजनीतील आमीर खानसारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगड येथील सभेत आज (रविवार) केली.

विक्रमगड येथे राष्ट्रवादीच्या  निर्धार परिवर्तनाचा या सभेत ते बोलत होते. जमीन विकून आलेला पैसा, पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार टीकत नाहीत. या लाटेने राज्याचे किती वाटोळे झाले, हे आपण अनुभवत आहोत, असे मुंडे म्हणाले.

गेल्या चार वर्षात महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त केले असून महाराष्ट्र लुटला आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही. जीवनावश्यक वस्तुंचे भाव इतके वाढले आहेत की हिशोब केला तर रात्रभर झोप येणार नाही. सरकारमधील अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आमची ताई तर लहान मुलांची चिक्कीच खाऊन गेली, अशी टीकाही त्यांनी पंकजा मुंडे यांचे नांव न घेता  केली.