मुलामुळे मी आणि मलायका एकत्र – अरबाज खान

0
533

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोघेही १८ वर्ष संसार केल्यावर वर्षभरापूर्वी विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने बी टाऊनमध्येही अनेकांना धक्का बसला. या दोघांनीही आपल्या निर्णयाबद्दल त्यानंतर बोलायचे टाळले परंतु त्यांच्यातील नाते कायम आदराचे राहिले. विभक्त होऊनही एकमेकांविषयीचा आदर कायम असण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा मुलगा असे खुद्द अरबाजने म्हटले आहे.

नवभारत टाइम्स. कॉम ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अरबाज त्याच्या आणि मलायकाच्या घटस्फोटानंतरच्या नात्याविषयी मोकळेपणाने बोलला. मलायका आणि त्याचा मुलगा अरहान याच्या संगोपनामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, त्याच्या मनावर याचा घटस्फोटाचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून दोघांनीही आपापसातील नातं आदराचं आणि एका मर्यादेपर्यंत आजही कायम ठेवले आहे.

अरबाज सांगतो, ‘माझ्या आणि मलायकाच्या लग्नाला १९ वर्ष झाल्यानंतर आम्ही विभक्त व्हायचं ठरवलं. त्यामुळे इतकी वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत घालवल्यावर तुमच्या एकत्र असंख्य आठवणी असणार ही गोष्ट कुणीच अमान्य करू शकत नाही. या सगळ्या आठवणी आयुष्यभर आमच्या सोबत राहणार आहेत. आमच्या नात्यात केवळ आम्ही दोघंच नव्हतो तर आमचा मुलगा अरहानदेखील होता. त्यामुळे आम्ही दोघांनी ज्यावेळी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी दोघांनाही मुलाची काळजी होती. आमच्यात काही गोष्टी घडल्या ज्यामुळे आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो. आम्हाला वेगळं होऊन आनंदी आयुष्य जगायचंय या मतावर आम्ही ठाम होतो. त्यामुळे जर आमच्यात सगळेच आलबेल असते तर आम्ही घटस्फोट घेतलाच नसता. इतक्या वर्षांत आमच्या आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग आले, गोष्टी घडल्या पण ती प्रत्येक गोष्ट अशी सार्वजनिकरित्या सांगणं मला पटत नाही’