‘मातोश्री’ बॉम्बने उडवून बाळासाहेबांच्या हत्येचा कट रचला होता; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

0
662

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मचरित्रांतून नवनवे दावे समोर येऊ लागले आहेत. यात राणे यांनी अनेक  खळबळजनक दाव्यांची  मालिकाच  सुरुच ठेवली आहे.‘मातोश्री’ बॉम्बने उडवून अज्ञातांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  हत्येचा कट रचला  होता, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

दरम्यान राणे यांना पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन, अशी धमकी शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली होती, असा खळबळजनक दावाही   राणे यांनी केला होता.   तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतही राणे यांनी दोन दावे केले आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राणे यांच्या इंग्रजीतील आत्मचरित्राने राजकीय क्षेत्रात खळबळ  उडाली आहे. आता  हे आत्मचरित्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मराठीतही येणार आहे. NO HOLDS BARRED- My Years in Politics या त्यांच्या आत्मचरित्रातील शिवसेनेतून बाहेर पडण्याबद्दलच्या घटनेवरून चर्चेला सुरुवात झाली आहे.  त्यामुळे मराठी वाचकांना या आत्मचरित्राची उत्सुकता  लागली आहे.