माढ्यातून शरद पवारांची माघार म्हणजे भाजपचा पहिला विजय – सुभाष देशमुख

0
731

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय  घेतला. हा  भाजपचा पहिला विजय आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज (सोमवार) दिली आहे. 

पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याची आज घोषणा केली. यावर देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशमुख म्हणाले की,  शरद पवार यांनी एक महिन्यांपूर्वी माढ्यातून निवडणूक  लढविण्याची तयारी केली आहे. मतदारसंघात त्यांनी सभाही  घेतल्या आहेत.  पण खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना डावल्याने त्यांच्या  कार्यकर्त्यांनी  नाराजीचा सूर लावला होता.

पवार यांना आपला समोर पराभव दिसत असावा, म्हणून त्यांनी माघार घेतली असावी, असे देशमुख म्हणाले. भाजपचे  वरिष्ठ नेते  जिथे निवडणूक लढविण्यासाठी सांगतील, तेथून मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.