महाराष्ट्राच्या जनतेला आता शांत झोप लागेल – संजय राऊत

0
655

मुंबई,दि.६(पीसीबी) – ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अखेर झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन खातेवाटप झाल्याने आता महाराष्ट्राच्या जनतेला शांत झोप लागेल, असं ते म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

ज्यांना मंत्री व्हायचं होतं किंवा विविध खाती हवी होती, त्यांच्या झोपीचा प्रश्न आहे. पण जनतेला आता शांत झोप लागणार आहे. महाविकास आघाडी आता आपल्या कामाला लागेल. त्यामुळे आता आमचं काम झालं आहे. यानंतर सरकारचं काम सुरु होईल, असंही राऊत म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला हे मान्य आहे. पण महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. काँग्रेसला प्रत्येक विचारासाठी दिल्लीला जावं लागतं. त्यामुळे थोडा उशीर झाला, असंही राऊत यांनी सांगितलं आहे.