भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम

0
386

सिडनी, दि. ७ (पीसीबी) – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये  कसोटी मालिका जिंकण्याचा  ऐतिहासिक पराक्रम केला आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत२-१ च्या फरकाने विजय संपादन केला आहे.  सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवसात भारताला विजयाची संधी होती. मात्र, अंधुक प्रकाश आणि पावसाने भारताच्या  मनसुब्यांवर पाणी फिरवले. अखेर दोन्ही पंचांनी खेळपट्टीची पाहणी करुन दोन्ही कर्णधारांशी चर्चा करून सामना अनिर्णीत  ठेवण्याचा निर्णय घेतला.   चेतेश्वर पुजारा सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.