फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा; कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस-शिवसेनेची मागणी

0
550

मुंबई,दि.२६(पीसीबी) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उद्याच्या उद्या बहुमत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त करत उद्या भाजप पराभूत होणार त्यामुळे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेससह शिवसेनेने केली आहे. फडणवीसांकडे बहुमत नाहीये. आमच्याकडे १६२ संख्याबळ आहे हे साऱ्या जगाने पाहिलं आहे. तेव्हा आता फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असं शिवसेना काँग्रेसने म्हटलं आहे.

तिन्ही पक्षांचे आमदार सुरक्षित आहेत. काळजीचं कारण नाही. उद्या आम्ही भाजपला पराभूत करणारच, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

भाजपला सत्ता आणि पैशाचा माज आला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्याने आता आम्हाला भाजपला पराभूत करण्यासाठी अवघे काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.