नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षात माझे नाव माहिती नसलेल्या प्रियंका गांधी आता सातत्याने माझ्या नावाचा जप करत आहेत. सध्या त्या आपल्या पतीचे नाव कमी आणि माझेच नाव जास्त घेत आहेत. यावरुन माझा अमेठीतील प्रचार यशस्वी झाला आहे, अशीच पावती मिळत आहे, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
स्मृती इराणी अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात रिंगणात आहेत. त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.
यावेळी अमेठीत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. या रुग्णाकडे आयुष्यमान भारतचे कार्ड होते. त्यामुळे त्याला उपचार नाकारण्यात आले आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
गांधी कुटुंबाला केवळ राजकारण प्रिय आहे. त्यांनी एका निर्दोष व्यक्तीला मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले, असा आरोपही यावेळी स्मृती इराणी यांनी केला.