‘प्रत्येकाला आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळायला हवी’

0
438

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रत्येकाला आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळायला हवी असे मतही तिने ठामपणे व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला आहे. बऱ्याच काळापासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सिनेवर्तुळात रंगते आहे. या चर्चा खऱ्या असल्याची अखेर मलायकाने कबुली दिली आहे. हे दोघेही अनेक कार्यक्रमांना सोबत दिसत आहेत. सुट्ट्यांचे दिवसही हे दोघे सोबत घालवत आहेत.

याबद्दल विचारले असता मलायका म्हणाली,’आपल्या देशात महिलांना अनेक घटनांना सामोरे जावे लागते. एखाद्या महिलेने अशी गोष्ट करणे टॅबू आहे. पण अशा गोष्टींकडे डोळसपणे पाहायला हवे. याबाबतीत कठोर आणि नकारात्मक होण्याऐवजी थोडे संवेदनशील होणे गरजेचे आहे. जेव्हा दुसऱ्या संधीची गोष्ट करतो तेव्हा त्याचा अर्थ आहे की आयुष्य पूर्णपणे जगण्याची संधी. प्रत्येकाला आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळायलाच हवी’.

‘माध्यमांची माझ्यावर सतत करडी नजर असते पण आम्ही अशा क्षेत्रात आहोत की त्याचा काहीच त्रास व्हायला नको. तुम्ही एकदा आयुष्याची घडी बसवली की त्रास होणे कमी होते आणि सर्व गोष्टी सुरळीत होतात, असेही ती पुढे म्हणाली.