पाकिस्तानने स्वत: बालाकोट हल्ल्याचा पुरावा दिला – पंतप्रधान मोदी

0
435

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा हा खुद्द पाकिस्ताननेच दिला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून वारंवार या हल्ल्याचे पुरावे मागितले जात आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखततीत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, बालाकोट हल्ला झाला की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असले तरी त्याचा पुरावे खुद्द पाकिस्ताननेच भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करुन दिला आहे. मात्र, या हल्ल्यात किती जण मारले गेले यावर चर्चा झडत राहतील त्या होऊ द्या. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने त्याचा जागतीक स्तरावर गोंधळ घातला असता त्यामुळे आम्हाला इथे निर्लष्करी कारवाई करायची होती. हवाई हल्यावेळी एकीकडे पाकिस्तानी जनतेच्या भल्याचा आम्ही विचार केला तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करायचे आमचे ठरले होते.

आमच्या भूमीवर दहशतवादी नाहीत असे आजवर पाकिस्तान जगाला सांगत आला आहे. मात्र, भारताच्या या कारवाईमुळे ते उघडे पडले. मात्र, भारतातून पाकिस्तानला हायसे वाटेल असे प्रश्न का विचारले जातात हा खरा प्रश्न आहे, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीका केली.