पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ भरत आली आहे; त्यांनी लवकरात लवकर नागरिकत्व कायदा मागे घ्यायला हवा – शाहिद आफ्रिदी

0
482

मुंबई,दि.२६(पीसीबी) – नागरिकत्व कायद्यासंबंधी देशवासियांना पूर्णपणे माहिती नसल्यानं देशात हिंसक घटना घडत आहेत. अशातच पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

“तुम्ही एकदम बरोबर म्हटलं आहे. नरेंद्र मोदींची वेळ भरत आली आहे. हिंदुत्वावर आधारित असलेल्या त्यांच्या आदर्शाचा देशभर विरोध केला जात आहे. फक्त जम्मू आणि काश्मिरमधूनच नाही तर संपूर्ण भारतातून त्यांचा विरोध केला जात आहे. त्यांनी लवकरात लवकर नागरिकत्व कायदा मागे घ्यायला हवा” असं ट्विट करत आफ्रिदीने नरेंद्र मोदींवर गंभीर टीका केली आहे.

शाहिद आफ्रिदीने याआधीही पुलवामाच्या घटनेचं ट्विट केलं होतं. त्यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं त्याला चोख उत्तर दिलं होतं. आता तर आफ्रिदीने मोदी यांच्याविरोधात तोफ डागल्याचे पाहायला मिळत आहे.