पुणे,दि.५(पीसीबी) – निसर्गाचं संतुलन बिघडलं आहे तसं राजकारणचंही संतुलन बिघडलं आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलंय. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.
महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा नाही. या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणालो काहीही करावं लागणार नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी सरकारला लगावला आहे. तसेच यापुढे नागरिक हे अधिक विचारपूर्वक मतदान करतील. जातीचं, पैशांचं राजकारण संपेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
विरोधासाठी विरोध करणारी माणसं आम्ही नाहीत. खातेवाटप झालं त्याबाबत आनंद आहे. उत्तम काम करावं, नागरिकांच्या अडचणी समजून काम करावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.