मुंबई,दि.२० (पीसीबी)- राज्यसभेतील आसनव्यवस्था बदलल्याने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सभापतींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
तिसऱ्या रांगे वरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. 2019 चा “रड्या ऑफ द ईयर अवार्ड” संज्यालाच दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच. https://t.co/eoKrp2pE6E
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 20, 2019
तिसऱ्या रांगे वरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. 2019 चा ‘रड्या ऑफ द ईयर अवार्ड’ संज्यालाच दिला पाहिजे, असं ट्वीट करत राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंनी टीका केली आहे.
मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
या बदललेल्या आसनव्यवस्थेमुळे शिवसेनेच्या भावना दुखावल्या आहेत. आमचा आवाज दडपण्यासाठी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.