परभणी, दि.२९ (पीसीबी) –देशातील जनतेच्या भावनेशी सध्या राजकारण खेळले जात असून द्वेषाच्या आधारावर दिवस-रात्र हिंदू-मुस्लीम अशी विभागणी करून बेरोजगारी, शेतमालाच्या किमतीचा प्रश्न याकडे डोळेझाक केली जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याची टीका ‘जेएनयू’ मधील युवा नेता कन्हैयाकुमार पाथरी येथील जिल्हा परिषद मैदानावर मंगळवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत तो बोलत होता.
नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणाला नागरिकत्व देण्याऐवजी नागरिकत्व हिसकावून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जन्माला घातला आहे. हा कायदा आवश्यक आहे हे उभे राहून सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही, अशी टीकाही कन्हैयाकुमार याने केली.
यावेळी आयोजक आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह राजन क्षीरसागर, राजेश विटेकर, दादासाहेब टेंगसे आदींसह विविध राजकीय, सामाजिक कार्यकत्रे व्यासपीठावर उपस्थित होते.