मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलेल्या धमकीमुळे मी शिवसेना सोडली, असा दावा करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा आणखी एक दावा समोर आला आहे. नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला , असा दावा राणेंनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
चंद्रशेखर बावळकुळे यांनी मला त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी माझी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. मला त्यांनी भाजप प्रवेशाचे आश्वासनही दिले होते. राणे यांना पक्षात योग्य तो सन्मान मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण नंबर दोनच्या मंत्र्यांची चलबिचल झाली. त्यांना कळलं की माझ्याकडची महत्वाची खाती राणेंकडे जातील, असे राणे यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या भल्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करा, असे सांगणाऱ्या दोन नंबरच्या मंत्र्यांना माझा विसर पडला. माझ्या घरी टॅक्सीतून फेऱ्या मारणारे अचानक गायब झाले, असा टोला राणे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.