देशात मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  

0
464

नागपूर, दि. ११ (पीसीबी) – जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. यामध्ये निवडणूक एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढील पाच वर्षांसाठी सक्षम हातात सरकार देण्याचा निर्णय  लोकांना घ्यायचा आहे.  देशात एक मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करा , असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, नागपूरसह वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघात  आज (गुरूवार) मतदान होत आहे. या सात जागांसाठी एकूण ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १४ हजार ९१९ मतदान केंद्रात मतदान होत आहे. सर्वाधिक ३० उमेदवार हे नागपूर मतदारसंघात असून सर्वात कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आहेत.