देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, आशिष शेलार यांच्यासह आणखी सात भाजप नेत्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

0
356

मुंबई,दि.०३(पीसीबी) : राज्यात मागील दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. कारण भाजपा नेत्यांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या एकूण सात नेत्यांविरुद्ध वाशीम शहर व मानोरा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. संतप्त झालेल्या अखिल बंजारा परिषदेचे अध्यक्ष श्याम राठोड यांनी वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कि, “पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे.” यामध्ये माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर, आशिष शेलार, शांता चव्हाण यांच्यासह माध्यमावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुण्यातील पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर बंजारा समाजासोबतच तिच्या कुटुंबाची खूप दिवसांपासून बदनामी सुरू आहे. यामध्ये भाजपा नेते आणि माध्यम रोज बदनामी करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली. शिवाय पूजा भावांच्या मृत्यूनंतर भाजप वेगवेगळे खुलासे करत असून यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा तक्रारकर्ते श्याम राठोड यांनी दिला आहे.

तर हि एकच नव्हे तर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा सचिव नेमीचंद भासू चव्हाण यांनी वाशीम शहर पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार दाखल केली आहे. त्यांचं म्हणणं आहे कि, “काही वृत्तवाहित्यांकडून बदनामीचे प्रकार होत असून या प्रकरणात मुलगी, तिचे कुटुंबीय व संपूर्ण समाजाची मानहानी झाली आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांसह प्रसारमाध्यमांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी केलेल्या तक्रारीत केली आहे. जर तात्काळ कारवाई झाली नाही तर, संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे.