मुंबई,दि.३१(पीसीबी) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेल नसल्यानं हे सरकार फार काळ टिकणार नसल्याची टीका केली होती. यावर अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. मुंबईतील बैठक पार पडल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“देवेंद्र फडणवीसांना आता याच्याशिवाय दुसरं काही काम आहे का?, ते बिचारे अस बोलणारच. मला त्यांच्याविषयी पूर्ण सहानभुती आहे. ताळमेळ नसल्यामुळं आमचं सरकार काळ टिकणार नाही मात्र आमचं सरकार थोडं-थोडं दिवस करून पाच वर्ष पूर्ण करणार” अस जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता आहे. मंत्रिपदातील विस्तारानंतर तिन्ही पक्षातील नेत्यांची नाराजी व्यक्त होत आहे. मात्र हे स्वाभाविक आहे. मंत्रिपदाची संख्या मर्यादित असल्यामुळं असं होणारच. परंतू शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेस आपापल्या पक्षातील नाराजी दूर करतील, असा वि्श्वासही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.