दुर्देवी: भरधाव रेल्वेखाली तब्बल १०० बकऱ्यांचा मृत्यू

0
456

राजुरा, दि. २८ (पीसीबी) – भरधाव रेल्वेखाली तब्बल १०० बकऱ्यांचा कळप चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, चुनाळा येथील लिंगय्या नामक गोलकर व्यक्तीच्या जवळपास १५० बकऱ्यांचा कळप रेल्वे क्रॉसिंग जवळील एका शेतात बसवण्यात आला होता. परंतु सकाळी अचानक हा कळप रेल्वे क्रॉसिंगच्या दिशेने पळत सुटला आणि नेमक्या त्याच वेळेस रेल्वे आल्याने दुर्दैवाने जवळपास १०० बकर्‍या आणि मेंढ्या चिरडल्या गेल्या. या घटनेमुळे बकरी मालकाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.