दिल्लीतील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश – सुप्रिया सुळे

0
596

बारामती, दि.१७ (पीसीबी) –देशाला आणि राज्याला शांततेची गरज आहे. व दिल्लीतील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचं अपयश असल्याचा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.

मारहाण करणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. भाजपच्या कार्यकाळातील पाच वर्षातील गोंधळाचं सत्य बाहेर येण्याची भीती असल्याने विरोधक अधिवेशनात गोंधळ घालत आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला.

बारामती येथील रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.