दिल्लीतल्या वेड्या मुलाचं बोलणं मनावर घेऊ नका; शरद पोंक्षे यांची राहुल गांधींवर टीका

0
426

पुणे,दि.१(पीसीबी) – दिल्लीतल्या वेड्या मुलाचं बोलणं मनावर घेऊ नका, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली आहे. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि हिंदू हेल्पलाईन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मी सावरकर वक्तृत्व’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात पोंक्षे बोलत होते.

दिल्लीतल्या वेड्या मुलाचं बोलणं लोकांनी फार मनावर घेऊ नये. ज्या व्यक्तीला आपली आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मारकासाठी वैयक्तिक देणगी दिली होती. ही गोष्टदेखील माहिती नाही. ती व्यक्ती सावरकरांबद्दल बोलली, तर त्या दिल्लीतील मुलाकडे फारसे लक्ष देऊ नका. अशा शब्दात शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, “वीर सावरकर यांना सरकार भारतरत्न देत नसेल तरीही आपण त्यांना भारतरत्नच म्हटलं पाहिजे. यापुढे वीर सावरकर यांचा उल्लेख करताना आपण त्यांना भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर असंच म्हटलं पाहिजे” असं अभिनेते शरद पोंक्षेंनी म्हटलं आहे.