“दिल्लीच्या जनतेनं आज एका नव्या राजकारणाला जन्म दिला”

0
363

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) – दिल्लीकरांनी त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला, त्याबद्दल आभार. हा केवळ दिल्लीचा नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे. दिल्लीच्या जनतेनं आज एका नव्या राजकारणाला जन्म दिलाय, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवालांनी पुन्हा एकदा दिल्लीकरांची मनं जिंकली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. निकाल स्पष्ट होताच केजरीवालांनी दिल्लीकरांशी संवाद साधला आणि त्यांचे आभार मानले आहेत.

ज्यांनी मला आपला मुलगा मानत प्रेम दिलं, ज्यांच्या घरात चांगलं शिक्षण मिळालं, गरजा पूर्ण झाल्या त्या प्रत्येकाचा हा विजय आहे, अशा शब्दांत केजरीवालांनी या विजयाचं वर्णन केलं आहे.