…तर शिवाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकावरून फेकले  असते – निलेश राणे

0
606

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचेसारखे मावळे असते. तर महाराज यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरे यांना टकमक टोकावरून फेकून दिले असते, असा निशाणा माजी खासदार निलेश राणे यांनी  साधला आहे.  

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आऱक्षण वैध असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी  उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन आभार मानले. यावेळी     मराठा क्रांती मोर्चाचे वकील, याचिकाकर्ते तसेच समन्वयक  आदी उपस्थित होते.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला शिवसेनेने पाठींबा दिल्या बद्दल  शिवसेनेचे आभार मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी मानले.

या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. निवडणुका जवळ आल्या म्हणून उद्धव ठाकरे बोलत असल्याचे म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे यांना लक्ष्य केले.