जे तुम्ही दडपून टाकण्याचा प्रयत्न करत होता, ते आता रस्त्यावर आलं आहे – संजय राऊत

0
427

मुंबई,दि.१२(पीसीबी) – दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. विद्यार्थी तरुणांबरोबरच विविध क्षेत्रातील लोक रस्त्यावर आले. या आंदोलनांवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर ट्विट करून टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांनी एक शेर ट्विट केला असून, “जे तुम्ही दडपून टाकण्याचा प्रयत्न करत होता, ते आता रस्त्यावर आलं आहे,” असं म्हटलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून भाजपावर टीकेचे बाण सोडणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुनावलं आहे.

“तुमने जिस खून को मक्तल में दबाना चाहा,
आज वह कूचा-ओ-बाजार में ओ निकला है
जय हिंद!”

असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. जेएनयू आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांवर सरकार घेत असलेल्या भूमिकेवर राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.