जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव; अमित शहांचे राज्यसभेत निवेदन    

0
346

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  आज (सोमवारी)  राज्यसभेत  जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव  मांडला.  त्यानंतर  संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला.

काश्मीरच्या विषयावर आम्ही चार विधेयके मांडणार आहोत. आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास आणि प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्यास तयार आहोत, असे अमित शहा  यांनी सांगितले. केंद्र सरकार कलम ३५ अ मध्ये बदल करण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे,  असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागच्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैद करण्यात आले आहे.