दिल्ली, दि.५ (पीसीबी) – कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये रामराज्य अवतरल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता, मात्र आज तिथली काय परिस्थिती आहे. जम्मू-कश्मीरमध्ये महाराष्ट्राचे १४ जवान गेल्या तीन महिन्यांत शहीद झाले. किती उद्योग केले, किती जणांना तिकडे रोजगार मिळाले. आज तिथे शाळा काढायची मला जमीन द्या, आहे का सरकारची तयारी, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींचे भाषण हे सरकारचा आवाज असतो मात्र, सरकारने जनेताही आवाज ऐकायला शिकले पाहिजे, असा खरमरीत टोला खासदार राऊत यांनी यावेळी लगावला.