छत्रपती संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत, म्हणाले…

0
423

कोल्हापूर, दि.१३ (पीसीबी) –  राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास देखील सांगितले आहे. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देखील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटद्वारे दिला आहे. त्यांच्या ट्विटवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, मी असे कोणते विधान केले? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला, असा सवाल केला आहे.

मा.छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले, ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहील. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या ट्विटवर दिली आहे.