नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांनी लोकांना १५ लाख रूपये देणार असल्याचे खोटे आश्वासन दिले होते. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी आश्वासने दिलेली नाहीत. गरिबीवर वार, ७२ हजार असे म्हणत पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाना साधला.
काँग्रेसचा ‘जन आवाज’ जाहीरनामा आज (मंगळवार) प्रसिद्ध करण्यात आला. ‘हम निभाएंगे’ असे जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्वासन दिले आहे. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासने –
काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत१०० ऐवजी १५० दिवसांचा रोजगार देणार
– पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार
– शिक्षणावर जीडीपीच्या ६ टक्के खर्च करणार
– मार्च २०२० पर्यंत २२ हजार पदे भरणार
– गरिबीवर वार, ७२ हजार, या नुसार एका वर्षा ७२ हजार, तर ५ वर्षांमध्ये एकूण ३.६० लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार
– मार्च २०२० पर्यंत देशातील सरकारी खात्यात २२ लाख नोकऱ्या देणार
– १० लाख तरूणांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या देणार
-शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
– गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची काँग्रेसची हमी, गरिबांचे किमान उत्पन्न ७२ हजार करु
– तरुणांना उद्योगांसाठी ३ वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील.
– शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही