‘कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे’ गणेश नाईकवर एक एनसी पण नाही

0
360
मुंबई, दि.९ (पीसीबी) – नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वातावरण निर्मितीसाठी आमदार रोहित पवार यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोपरखैरणे येथे झालेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांचा समाचार घेतला होता.
गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत नाईक माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक”, नाना पाटेकरांच्या सिनेमातील या डायलॉग म्हणत गणेश नाईक यांनी आव्हाडांवर पलटवार केला.
आव्हाडांनी गणेश नाईक हे खंडणी घेतात, धमकी देतात, असे अनेक आरोप केले. त्यावर गणेश नाईकांनी उत्तर देत म्हटले, “कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसी पण नाही.” असे म्हणत नाईक यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिले.