कोंढवा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना बिहार सरकारकडून २ लाखांची मदत  

0
438

पुणे, दि. २९ (पीसीबी) – पुण्यातील कोंढवा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारने ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

नितीशकुमार यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची तर जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, पुण्यातील कोंढवा या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेबद्दल आपल्याला अतीव दुःख झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.