“कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही”

0
198

मुंबई,दि.२७(पीसीबी) – कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही, अश्या शब्दात भाजपचे नेते निलेश राणे यांनी सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट पोस्ट केलं आहे.

निलेश राणे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही.

दरम्यान, तंत्रज्ञान चा वापर करा म्हणून सांगितलं म्हणजे सर्व प्रश्न सुटले का केवळ स्वताच अपयश झाकण्यासाठी तंत्रज्ञान वापर करा म्हणून सांगून मोकळे झालात आम्हा गरीब जनतेला घरात बसून कसे पैसे कमवायचे ते पण सांगा, असंही निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले आहेत.