काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नगरमध्ये एकही जागा जिंकू देणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

0
858

अहमदनगर, दि.७ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नगरमध्ये एकही जागा जिंकू देणार नाही, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील.१२ विरुद्ध शून्य अशी परिस्थिती नगर जिल्ह्यात असेल आणि यात कोणतीही अतिशयोक्ती नाही, असं ते म्हणाले.

मला पक्षप्रवेश कधी द्यायचा याचा निर्णय भाजपाध्यक्षांचा असेल तसेच मंत्रिपद द्यायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, माझ्यावर लोकसभेच्या दोन जागा जिंकून आणण्याची जबाबदारी होती. ती मी योग्यरित्या पार पाडली, असंही विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.