काँग्रेसचे सहा आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

0
588

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – काँग्रेसने भाजपच्या संपर्कात असलेल्या आपल्या सहा आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे  सहाही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर  काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

या सहा आमदारांमध्ये अस्लम शेख, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, सिद्धराम मेहेत्रे, भारत भालके यांचा समावेश आहे. हे आमदार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान,  काँग्रेसचे  माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. काँग्रेससाठी हा   मोठा धक्का  असेल.