आमची रेषा मिटवू नका, नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल – देवेंद्र फडणवीस

0
373

मुंबई,दि.६(पीसीबी) – आमची रेषा मिटवू नका, नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल, असं विधान माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीतील अंजुर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस बोलत होते.

ठाकरे सरकारकडून फडणवीसांनी आणलेल्या अनेक योजनांना ब्रेक लावण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आमच्या विकासाच्या रेषेपेक्षा मोठी रेषा मारा. आमची रेषा मिटवू नका. नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

आम्ही केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ शकत नाही. कामाचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर जनता सुज्ञ आहे. ते ज्याचे त्याचे माप त्याच्या पदरात टाकते, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला.