आधीच या देशात इतकी रोगराई आहे; त्यात आणखी एक वाढ – राज ठाकरे

0
353
औरंगाबाद, दि.१२ (पीसीबी) – औरंगाबादमध्ये आज मनसेचा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी, ३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी असे म्हटलंय.
बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना व्हायरसमुळे कशी काय शिवजयंती साजरी करायची, असे लोकांनी मला सांगितले. मी म्हटले, आधीच या देशात इतकी रोगराई आहे, त्यात आणखी एक वाढ, त्याने काय फरक पडतो, तुम्ही काळजी घेतली पाहिजे, याबद्दल काही प्रश्न आणि वाद नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
तिथीनुसार साजरी करायची का याबद्दल सांगायचे झाले तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे,’ असे ठाकरे म्हणाले.