अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून नियमित सुनावणी

0
713

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – अयोध्येतील बाबरी आणि राम मंदिर वादाच्या मुख्य सुनावणीस आजपासून सुप्रीम कोर्टात सुरुवात होणार आहे. कारण हा प्रश्न सुटावा म्हणून मध्यस्थांची समितीही नेमण्यात आली होती. मात्र मध्यस्थांच्या समितीचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यांनी जो अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला त्यावरुनच हेच स्पष्ट झाले की मध्यस्थ समितीचा उपयोग झाला नाही.

त्यानंतर आता आठवड्यातले तीन दिवस नियमित सुनावणीचा निर्णय घेण्यात आला आहे.. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने ६ ऑगस्टपासून अयोध्या जमीन वादावर नियमित सुनावणी घेऊ, असे २ ऑगस्टला सुप्रीम कोर्टासमोर म्हटले होते.