मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली माजी महापौर दत्ता दळवींना अटक

0
148

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखील मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) दत्ता दळवी यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर भांडूप पोलिस स्टेशनबाहेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दत्ता दळवी यांना न्यायालयात हजर केले. कोर्टाने दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली. अटकेनंतर दत्ता दळवी यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे दत्ता दळवी यांनी सांगितलं.

दत्ता दळवी काय म्हणाले ?
माजी महापौर दत्ता दळवी यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितलं. धर्मवीर चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांनी ज्या शब्दाचा वापर केला होता, त्याच शब्दाचा वापर मी केला. मालवणी भाषामध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या नाहीत, असेही दत्ता दळवी म्हणाले. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सुडाच राजकारण आहे, असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

दत्ता दळवींना न्यायालयीन कोठडी –

दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दत्ता दळवींची 2 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. अटकेपूर्वी दिली जाणारी 41(a) ची नोटीस स्वीकारण्यास दळवींनी नकार दिल्याचा दावा, यावेली कोर्टात पोलिसांनी केला होता. मात्र या कलमाखाली कस्टडीची गरज नसल्याचं स्पष्ट करत दंडाधिकारी एम.आर. वाशिमकर यांनी पोलीसांची मागणी फेटाळली. त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीनासाठी वकील आजच अर्ज करणार आहेत.

संजय राऊतांकडून समर्थन –
दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पोलिस स्टेशन गाठले होते. त्यानंतर त्यांनी दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत असल्याचेही सांगितले. त्याशिवाय दत्ता दळवी काय चुकीचं बोलले? असाही सवाल केला. दत्ता दळवी यांनी भाषणामध्ये शिवसैनिक म्हणून भाषण केले. ते म्हणाले की, आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकाने फोडून काढलं असतं. त्यात काय चुकंच वापरलं. त्यांनी भोस** हा शब्द वापरला. हा शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी घातलेला आहे.. सेन्सरने तो शब्द हटवला नाही. तो शब्द अक्षेपार्ह असेल तर चित्रपटाच्या कलाकार, निर्मात्यांवरही गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवींनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.