डॉ.अमोल कोल्हेंच उमेदवार, पण जिंकणार कोण ? |थर्ड आय – अविनाश चिलेकर
जय महाराष्ट्र करत उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मावळ लोकसभा मतदारसंघातसुध्दा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणे पसंत केले. आढळराव आणि बारणे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार असे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, भाजपने शिरूर मध्ये जोरदार मोहीम आखली आणि संपर्क अभियान राबवले. कार्यकर्त्यांचे मेळावे, समाज घटकांच्या बैठका, गाठीभेटी, प्रवेश सुरू आहेत. केंद्रीय मंत्र्यांचा सहा महिन्यापूर्वी दोन दिवसांचा या मतदारसंघात विशेष दौरा झाला होता. आता पुन्हा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी शनिवार-रविवार असे दोन दिवसांत हा मतदारसंघ पिंजून काढला. हडपसरला युवकांचा मेळावा घेतला. खेड तालुक्यातील डेहणे गावात आदिवासी बांधवांची बैठक घेतली. आंबेगाव तालुक्यातील बैलगाडी शर्यतीला खास उपस्थिती लावली. जुन्नरमध्ये लाभार्थींच्या भेटीगाठी घेतल्या. विशेष म्हणजे या दौऱ्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. लंबी रेस का घोडा आहेत. अजित पवार यांना तेच खुपते म्हणून तिथेच थोडेसे दुखते. चार वर्षांत खासदार म्हणून लोकसंपर्कात डॉ. कोल्हे कमी पडले असा सार्वत्रिक आक्षेप आहे. वर्षभरात म्हणजे ३६५ दिवसांत दौरे, गाठिभेटींने सगळी गावे पिंजून काढली आणि ती कमतरता भरून काढली तर लोक पुन्हा महाआघाडी म्हणून डॉ. कोल्हे यांच्या बरोबर येतील. राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांची गोळाबेरिज मोठी आहे. पूर्वी आढळराव पाटील यांना मिळालेली मते शिवसेना म्हणून अधिक होती. राष्ट्रवादीचे पाचही आमदार ताकदिचे आहेत. डॉ. कोल्हे कधीच उपलब्ध नसतात, ही त्यांची नाराजी दूर करावी लागेल. असे झालेच तर शिंदे आणि भाजप एकत्र आले तरी फरक पडणार नाही. खासदार डॉ. कोल्हे यांच्यासारखे व्हिजनरी युवा नेतृत्व हीच राष्ट्रवादीची आज सर्वात मोठी भक्कम बाजू आहे. माजी खासदार आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे तिथे अनेक अर्थाने थिटे पडतात. अजून वर्ष आहे, तोवर वाट पाहू.
Sign in to your account