८००० तासांचा अनुभवही तोकडा ठरला; विमानाला शेवटपर्यंत काबूत ठेवण्याचा प्रयत्न करणारे कॅप्टन सुमित सभरवाल कोण?

0
18

दि . १२ ( पीसीबी )  – अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदांतच भीषण अपघातग्रस्त झाले. लंडनकडे २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सना घेऊन निघालेले हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच जमिनीवर कोसळले, ज्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल  आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. या अपघातात अनुभवी पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या ८२०० तासांचा अनुभवही तोकडा पडल्याचे दिसून येत आहे.

विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले :

कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीचे ८२०० तासांचा अनुभव असलेले विमानचालक आहेत, तर सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांना ११००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता. 

कॅप्टन सुमित सभरवाल यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर येत असल्याचे दिसून आले, ज्यामुळे अपघाताची भीषणता स्पष्ट झाली.

 कोण आहेत कॅप्टन सुमित सभरवाल?

कॅप्टन सुमित सभरवाल हे एअर इंडियाचे अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित पायलट आहेत. त्यांच्या नावे हजारो तासांचा फ्लाइट अनुभव आहे. AI171 या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे नेतृत्व त्यांच्या हाती होते. या घटनेच्या क्षणी, विमान टेकऑफ करत असताना अचानक तांत्रिक बिघाड आणि अडथळ्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती. 

अपघातापूर्वी विमानाच्या पायलटने जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता, पण त्यानंतर विमानाने एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही, ज्यामुळे विमानाशी संपर्क तुटला. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झाले.

या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठी बातमी म्हणजे, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते.

विजय रूपाणी यांच्या प्रवासाची माहिती आधी फक्त सूत्रांमधून समोर येत होती, पण आता त्यांच्या नावाचा अधिकृत ‘बोर्डिंग पास’ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बातमीला दुजोरा मिळाला असून, त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे, मात्र याबाबत अजून अधिकृत पुष्टी बाकी आहे. या अपघातामुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.