पिंपरी, दि. ३ –
लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने पिंपरी येथील मोरवाडी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मुंडे साहेबांच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली. काटे म्हणाले, “गोपीनाथजी मुंडे हे फक्त एक नेते नव्हते,तर ते सामान्यांचे, वंचितांचे आणि महाराष्ट्राच्या मातीतील सर्वसामान्यांचे खरे आधारस्तंभ होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी समर्पित केले. त्यांचे विचार आणि त्यांची जनसेवेची तळमळ आजही सर्वांना प्रेरणा देत आहे.”
आमदार श्री महेशदादा लांडगे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, स्व.गोपीनाथजी मुंडे यांनी ग्रामीण भागातून येऊन दिल्लीपर्यंत मजल मारत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला अमीट ठसा उमटवला. “त्यांच्या कार्यामुळेच आज भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यांचे कार्य आणि विचार हे आपल्या पक्षासाठी एक अनमोल ठेवा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला आमदार उमाताई खापरे,प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य श्री मोरेश्वर शेडगे,श्री माऊली थोरात, माजी महापौर श्री केशव घोळवे, सरचिटणीस तथा माजी नगरसेवक श्री शीतल शिंदे,श्री अजय पाताडे,शैलाताई मोळक,श्री विजय फुगे,माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे, श्री बिभीषण चौधरी,श्री नंदकुमार दाभाडे, श्री खंडूदेव कठोरे,श्री दत्तात्रय ढगे,श्री सुनील लांडगे,श्री नंदू कदम,रोहिणीताई रासकर, श्री दत्ता यादव,श्री संतोष टोंणगे,श्री मधुकर बच्चे,श्री दीपक नागरगोजे,श्री समीर जावळकर,मंडल अध्यक्ष श्री मंगेश धादगे,श्री सतीश नागरगोजे,श्री मनोज ब्राह्मणकर,श्री प्रमोद ताम्हणकर,श्री शशिकांत पाटील,श्री सचिन राऊत,श्री संजय परळीकर,श्री नेताजी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करत त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात अधिक सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.