राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या 90 जागा लढवणार

0
310

महाराष्ट्र, दि. ७ जुलै (पीसीबी) – मागच्या आठवड्यात राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला. समर्थक आमदारांसह अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे, तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. दोन्ही गट पक्षावर दावा सांगतायत. आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस आहोत, असं दोन्ही गटांच म्हणणं आहे. दरम्यान, भाजप बरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या 90 जागा लढवणार आहे.

अजित पवार गटाकडे 40 पेक्षा जास्त आमदारांच समर्थन आहे. पक्षांतर्गत बंड करताना अजित पवार समर्थक आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलं होतं.विधिमंडळात तसेच संघटनात्मक पातळीवर दोन्ही गटांनी परस्परांच्या नियुक्त्या रद्द करुन नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. अजित पवार यांनी भविष्याच्या दृष्टीने पावल उचलण्यास सुरवात केली आहे. आपण सर्व कायदेशीर बाबींचा विचार करुनच हे पाऊल उचललय. त्यामुळे आमच्या आमदारकीला कुठलाही धोका नाही, असं अजित पवार समर्थक आमदारांच म्हणणं आहे. दरम्यान महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी भविष्याच्या दृष्टीने पावल उचलण्यास सुरुवात केली आहे.

अजित पवार आणि भाजपा यांच्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 आणि विधानसभेच्या 288 जागा आहेत.

राष्ट्रवादीला कुठल्या भागात जास्त जागा मिळणार?
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याच म्हटलं होतं. अजित पवार यांच्यासोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना विदर्भ आणि शहरी भागात भाजपा तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळू शकतात. जिथे काँग्रेस बळकट आहे, त्याठिकाणी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळू शकतात.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 90 जागा लढवणार असल्याच म्हटलं होते. त्यावर बावनकुळे गुरुवारी म्हणाले की, “जागांबद्दल काय बोलण झालं? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तो पर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. साधराण युतीमध्ये असं असंत” “आम्ही म्हटलं इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरं चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होतं. त्यामुळे राष्ट्रवादी 90 जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्वाच नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.