मुंबई, दि. ३० : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. हगवणे परिवार आता तुरूंगात असून त्यांना कडक शिक्षा होण्याची मागणी केली जात आहे. हे प्रकरण चर्चेत येताच वैष्णवीची भावजय मुयरी हिनेही आपला छळ झाल्याचं म्हटलं होतं. राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिल्याचं सांगितलं. त्यामुळे विरोधकांनी राज्य महिला आयोगावर टीका केली होती. अशातय यावर बोलताना ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्य महिला आयोग पदावर अराजकीय व्यक्ती हवी असल्याची मागणी केली आहे.
महिला आयोग राज्याचा किंवा राष्ट्रीय असेल त्या जागेवर नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे. राजकारणातील सोय म्हणून कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रात आणि राज्यात राजकीय व्यक्तीच आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ नाही हे घटनात्मक पद आहे. यामुळे राज्यातल्या देशातल्या महिलांवरील अत्याचाराला वाटा फुटते. आम्ही त्याला काय करतो, की नेत्याच्या जवळच्या महिलेला त्या पदावर बसवतो आणि कॅबिनेट दर्जा देतो हे चुकीचे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
स्थानिक निवडणुका महायुती एकत्र लढणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
मोदी-फडणवीस, शिंदेंनी पुस्तक वाचायला हवं- राऊत
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलीस यांचं राज्य निर्माण करणं, यांना घाबरून काही लोक पळून जातात. काही लोकं हा दबाव स्वीकारत नाहीत, त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं. हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचावं, त्यांनी यासाठी वाचावं की यंत्रणांचा गैरवापर केला. जुलमी राज्य व्यवस्थेचे हे सूत्रधार आहेत. एकनाथ शिंदे यांनी पुस्तक वाचायलाच पाहिजे आणि शांतपणे पुस्तकाचा गाभा समजून घ्यायला पाहिजे. बराचा काळ ते आमचे सहकारी होते, जेव्हा त्यांचा भाजपात पळून जाण्याचा मार्ग निर्माण झाला त्याआधी ते माझ्यासोबत होतेच, माझ्या बाबतीत काय घडलं याची त्यांनी कल्पना होती. त्यामुळे पत्रात लिहिलं आहे की तुम्ही या घटनांचे साक्षीदार आहात म्हणून पुस्तक वाचले पाहिजे, असं राऊत म्हणाले.