रवी राणा सारखे छपरी नेते महायुतीत असतील तर…

0
61

अमरावती, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) – राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे सर्वच पक्षांना वेध लागले आहेत. राज्यपालपदी नियुक्तीवरून भाजपवर आश्वासन फेटाळल्याचा ठपका ठेवत माजी खासदार नवनीत राणांच्या जात वैधतेला आव्हान देणारा देणारे शिवसेना नेते आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी आज आमदार रवी राणांवर जोरदार टीका केली आहे. “रवी राणा सारखे छपरी लोक महायुतीमध्ये असतील तर आम्ही बाहेर निघू” असं म्हणत अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्याचा दिसतय.मला गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल पदाचे आश्वासन दिले होते, असं म्हणत शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप केला होता. यावर अडसूळ अमित शहांना ब्लॅकमेल करत असल्याचे रवी राणांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावर आता अभिजीत अडसूळ यांनी रवी राणांवर हल्लाबोल केलाय.

काय म्हणाले अभिजीत अडसूळ?
अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिलं होतं. त्यानंतर अमित शहा यांच्या विनंतीला मान देत आनंदराव अडसूळ यांनी लोकसभा निवडणूक लढली नाही. आज जर ते निवडून आले असते तर अमरावती जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाला असतं. मात्र या जिल्ह्याचा आणि शिवसेनेचा लॉस झाला आहे असं अभिजीत अडसूळ म्हणाले.

रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय बालिशपणाचे आणि अस संसदीय वक्तव्य आहे. सगळ्या पक्षांचे नेते त्यांच्या विरोधात असतात असे म्हणत अभिजीत अडसूळ यांनी रवी राणांवर जोरदार टीका केलीये. हे असे छपरी नेते शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर आशीर्वाद चे भाषा वापरत असतील आणि असे नेते स्वतःला महायुतीचे नेते समजत असतील तर महायुती मधून त्यांना बाहेर फेकले गेले पाहिजे. हे असे छपरी लोक जर महायुतीमध्ये राहत असतील तर आम्ही शिवसेनेतून बाहेर पडू, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही
शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर कायदेशीर आव्हान देण्याचा इशारा दिल्यानंतर अभिजीत अडसूळ यांनीही नमुनीत राणांच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बोट ठेवले आहे. नवनीत राणा यांचा फॉर्म भरायच्या आधी सुप्रीम कोर्ट अचानक येते आणि त्यांच्या बाजूने निकाल देते, असं ते म्हणालेत. बाबासाहेबांनी अधिकार दिल्याप्रमाणे, जर सुप्रीम कोर्टात न्याय मिळाला नाही तर मी क्रेव्हिटी पिटिशन टाकू शकतो. आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल मान्य नाही ,असेही ते म्हणाले.