– विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती
दि. २६ ( पीसीबी ) – बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यावर अखेर निर्णय झाला आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील याबाबत मागणी केली होती. आपल्या सात मागण्यांसाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या सात मागण्यांमध्ये उज्वल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे.
ती दिली आहे. “बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.”, असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.
या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान, मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या मागण्या नेमक्या कोणत्या?
1) केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे.
2) फरार आरोपी कृष्णा आंधळेला त्वरित शोधून अटक करावी.
3) याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
4) संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.
5) वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा.