भाजप लागले तयारीला, ५८ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर

0
4

दि . १३ ( पीसीबी )- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात महापालिका निवडणुकीच्या कामाला पक्षांकडूकन वेग आला आहे. राज्यात महापालिका निवडणुकाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. अशातच, महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने भाकरी फिरवली आहे. भाजपकडून 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने वरिष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांना पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून अखेर भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडून जिलाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांच्या सहीने भाजपकडून परिपत्रक जारी करत नव्या जिल्हाध्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोकण, पश्चिम महराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत अशा प्रदेशात राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 58 जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये, मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी 3 पदे तयारी करण्यात आली आहे. उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसाठी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये, अनुक्रमे दीपक तावडे, दीपक दळवी आणि विरेंद्र म्हात्रे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले. त्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात येत आहे.